ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी
Sunday, March 19, 2023
Friday, March 17, 2023
धाराशिव जिल्ह्याकरिता दिनांक १८ ते २२ मार्च, २०२३ साठी कृषि हवामानअंदाज व हवामानआधारित कृषि सल्ला पत्रिका
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक १८ मार्च, २०२३ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत हा झाला बदल
माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावाने राज्यात शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबविण्यात येते त्यात आता थोडासा बदल करण्यात आला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याजेनेअंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून (Combination) शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयात गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले आहे. बँकऋण घेऊन किंवा पशुसंवर्धन वा अन्य विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गाय, म्हैस यांना टॅगिंग करण्यता येते. तथापि, स्वखर्चाने घेतलेल्या जनावरांना टॅगिंग नसल्याने गोठे देण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतात व लाभार्थी पात्र असूनदेखील या योजनेतील लाभापासून वंचित राहतात. सदर बाबीसंदर्भात सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयामधील अ. क्र. १) मधील अनुज्ञेयता मुद्यातील दुसऱ्या परिच्छेदातील
"गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील."
या ऐवजी
"संबंधित ग्रामसेवक / तांत्रिक सहाय्यक / ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करुन लाभार्थ्याकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी. पंचनामा करतांना ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यापैकी कोणीही एक हजर असणे आवश्यक राहील. " असे वाचण्यात यावे. असे कळविण्यात आले आहे.
काय आहे योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या ४ कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे.
यामध्ये
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणं
शेळीपालनासाठी शेड बांधणं
कुक्कुटपालनासाठी शेड बांधणं
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
याचा समावेश आहे.
शासन निर्णय
महिलांना एस. टी. प्रवासात ५० टक्के सवलत आजपासून लागू
महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५०% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. १७.०३.२०२३ पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्यात येणार आहे.
परिपत्रक
Thursday, March 16, 2023
इतर राज्यात विक्री केलेल्या कांद्यालाही अनुदान द्यावे;आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
धाराशिव - बाजारात कांद्याचे भाव अचानक कोसळल्याने अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रति क्विंटल रु. 300 अनुदान जाहीर केले असून पर राज्यात विक्री केलेल्या कांद्याला देखील याच प्रमाणे अनुदान देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
धाराशिव सह सीमा भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा बेंगलुरू,हैद्राबाद व बेळगाव यासह इतर ठिकाणी अत्यंत अल्प दराने विकला आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात मोठ्या कष्टाने पिकवलेला चांगल्या प्रतीचा शेतमाल कवडीमोल दराने जात असताना मोठ्या वेदना होतात. सरकारने घोषणा केल्या प्रमाणे या अनुदानाचा लाभ हा केवळ राज्यात विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे इतर राज्यात कांदा विक्री केलेल्या धाराशिव सारख्या सीमावर्ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
इतर राज्यात विक्री केलेल्या कांद्याची शेतकऱ्यांकडे संगणकीय (कंप्युटराईज्ड) बिले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना या अनुदानाचा लाभ देणे शक्य आहे. सरकारने याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करणे आवश्यक असून आजवर शिंदे फडणवीस सरकार बळीराजाच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहिले आहे. त्याचप्रमाणे या संकटात देखील शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असून इतर राज्यात विक्री केलेल्या कांद्यासाठी देखील शेतकऱ्यांना, शासनाने जाहीर केलेल्या प्रती क्विंटल रु ३०० अनुदानाची रक्कम देण्याची आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
Wednesday, March 15, 2023
Tuesday, March 14, 2023
रुग्णालयातील मेडिकल मधून औषधे घेण्याची सक्ती करता येत नाही
वाचा हे परिपत्रक
बदलत्या जीवनशैलीमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. घरात आजारी व्यक्ती नाही असे क्वचितच एखादे घर पाहायला मिळते. प्रत्येकाला शासकीय रुग्णालयात कमी खर्चात, वेळेत उपचार मिळतील याची शास्वती न वाटल्याने खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. उपचारामध्ये औषधांचा खर्च अधिक असतो. औषधांचा खर्च कमी व्हावा यासाठी जेनरिक औषधे देखील असतात मात्र ती स्वस्त औषधे रुग्णालयातील मेडिकल मध्ये उपलब्ध नसतात आणि जी उपलब्ध औषधे आहेत तीच औषधे रुग्णालयातील मेडिकल मधूनच घेण्याची सक्ती केली जाते त्यातच रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असते. काही रुग्ण याविरोधात आवाज उठवतात मात्र त्याबाबत नेमके परिपत्रक काय आहे, नियम काय आहेत हेच माहिती नसल्याने तो आवाज तिथेच दडपला जातो.
"रुग्णालयातील औषधी दुकानातूनच रुग्णांनी औषधांची खरेदी करावी अशी सक्ती नाही, रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करु शकतात" अशा आशयाचा फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसतील अशा दर्शनीय भागात प्रदर्शित करावा, अशा सूचना देण्याचे परिपत्रक यापूर्वीच काढले आहे. औषध सक्ती केल्यानंतर तक्रार करताना हे परिपत्रक आणि संदर्भ महत्वाचा आहे.
जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु करणेबाबत कार्यपध्दती व नियमावली
https://www.dainikjanmat.in/2023/03/blog-post_14.html
-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...
-
निती आयोगाचे पटकावले पाचव्यांदा ३ कोटींचे बक्षीस गुरुजींनी जिल्ह्याची मान उंचावली उस्मानाबाद दि.३ - उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्हा असून...