उस्मानाबाद- डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कँपस,उस्मानाबाद येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे वडगांव(ज)ता.कळंब येथे दि.07 जुलै बुधवार रोजी खरीप हंगाम शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमादरम्यान मका पिकांवरील लष्करी अळीचे नियंत्रण व व्यवस्थापन,खरीप पिके किडी व रोग व्यवस्थापन,जलसंधारणाचे महत्व तसेच फळबाग लागवड तंत्रज्ञान इत्यादी विषयावर कृषि अधिकारी आणि कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी परिसरातील सर्व शेतकरी बांधवानी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहान कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. दंडनाईक यांनी केले आहे.
ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी
-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...
-
निती आयोगाचे पटकावले पाचव्यांदा ३ कोटींचे बक्षीस गुरुजींनी जिल्ह्याची मान उंचावली उस्मानाबाद दि.३ - उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्हा असून...