भूम - काळाच्या ओघाप्रमाणे आपण बदलणे गरजेचे आहे कृषिचा कोणताही उद्योग एका कडे न राहता शंभर जणांकडे असला पाहिजे तरच गोरगरीब व मध्यमवर्गीय तारला जाईल हे बदल घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेशभाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ भूम नगर परिषद समोर सभेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. या प्रसंगी बोलताना बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की
त्या काळी स्व. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी साखर कारखाने हे सहकारी तत्वावरच चालवले जावे असा कायदा सर्वसामान्यच्या हितासाठी तयार केला होत तेव्हा आपली लोकसंख्या 35 कोटी परंतु या लोकांनी स्वतःच्या फायदा साठी आत्ताची लोकसंख्या 129 कोटी असताना देखील कायदा मोडून खाजगीकरण करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दादागिरी ची भाषा करू लागले आहेत यांना यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आली आहे. सध्या महाराष्ट्र सरकारला 22000 कोटी रुपयांचा टॅक्स जमा होतो तो रोजगार हमीवर खर्च करण्याची तरतूद आहे तरी पण मागील 10 वर्षा पासून हे सरकार रोजगार हमीवर पैसे खर्च न करता रस्ते विकासासाठी तारण ठेवला आहे. सत्ता आमच्या हातात दिली तर हा पैसा बेरोजगारांना कामे व भत्ता वाटप करण्यासाठी वापरणार . 21 टीएमसी पाण्यावर बोलताना सांगितले की गेल्या 15 वर्षा पासून मी हे ऐकत आहे याचे नुसते राजकारण चालू आहे ते पाणी आज ना उद्या मिळणारच आहे व आम्ही सत्ता श्रीमंत होण्यासाठी मागत नाहीत तसे असते तर मागेच सत्तेत बसलो असतो आम्हाला बहुजनांचा विकास घडवायचा आहे आपली सत्ताआली तर आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना पगारवाढ करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले..
या प्रसंगी शेतकरी नेते गोरख भाऊ भोरे, नेते प्रवीण रणबागुल वंचित चे माजी जिल्हा अध्यक्ष मुजीब भाई पठाण, जिल्हाध्यक्ष वाघमारे, अनदुरकर सर, मुसभाई शेख, एजाज काजी, ऍड सिराज मोगल, वांचीतचे मुकुंद लगाडे, रसूल भाई पठाण, सुनील भाऊ कांबळे,अनुराधा लोखंडे, तानाजी बनसोडे, परांडा तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड,वाशीचे दिलीप गरड, के टी गायकवाड, दत्ता शिंदे, नेते नवनाथ पडळकर जिप सदस्य सौ छाया ताई सुनीलभाऊ कांबळे, उषाताई सुरेशभाऊ कांबळे, प्रदीप कांबळे,सुभाष वाघमारे काकासाहेब मारकड आदी उपस्थित होते.
Tags
उस्मानाबाद