आ.सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला जिल्हाप्रमुख गौतम लटके यांची पत्रकार परिषेदेत माहिती



 जिल्हा नियोजन बैठकीत अभिनंदन ठराव मंडण्यावरून झाला होता राडा 

परंडा :- उस्मानाबाद येथे दि 25 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली  तर काही ठराव घेण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य यांनी नीरा भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडणयात आला  यावेळी माजी मंत्री तथा  आ तानाजी सावंत यांनी  या ठरावात दुरुस्ती करण्याची सूचना केली  सावंत म्हणाले की ,मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी खास बाब म्हणून अतिशय तातडीने बैठक लावून लवकरात लवकर मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे याची सविस्तर माहिती नियोजन मंडळाला दिली व पाहिले उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची सूचना ,हट्ट धरला त्यामुळे यामध्ये फक्त जलसंपदा मंत्री यांचे अभिनंदन  करण्याच्या ठरावात बदल करून  मुख्यमंत्री व  जलसंपदा मंत्री यांचे अभिनंदन करण्याचा ठराव घ्या अशी सूचना करणे म्हणजे पक्ष विरोधी भूमिका असू शकत नाही. असे यावेळी जिल्हाप्रमुख  गौतम लटके यांनी स्पष्ट केले  

    एखाद्या कामात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ढिलाई केली तर जनतेचे प्रश्न सुटणार नसतील तर  लोकप्रतिनिधिनी त्या त्या वेळेस प्रशासनाला सूनवणे गरजेचे आहे जर प्रशासकीय अधिकारी  यांनी कामात दिरंगाई केली तर याचा दोष जनता सरकारला देते जनतेने सरकारला दोषी धरू नये म्हणून आम्ही अधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचे ही काळजी आम्ही घेतोय असे सावंत याना वाटले  परंतु काहींनी याचा विपर्यास करून आ. सावंत यांना  बदनाम करण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा असल्याचे  मत शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके  यांनी परंडा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले 

 यावेळी या पत्रकार परिषदेत  जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव,सतीश मेहेर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते 

 आ. सावंत यांनी मांडले मुद्दे 

  जिल्हा नियोजन मधील निधी लोकसंख्या प्रमाणे वाटप व्हावा कोणत्याही तालुक्यावर अन्याय होऊ नये 

शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी महावितरण च्या अधीक्षक अभियंता यांनी लक्ष देणे  गरजे आहे

 नियोजन मंडळाने महावितरण ला देखभालिसाठी ज्यादा निधीची तरतूद करावी 

अतिवृष्टी झालेल्या तालुक्याला ज्यादा निधीची तरतूद करावी अश्या मागण्या केल्या

Post a Comment

Previous Post Next Post