उस्मानाबाद :- प्रभाग क्रमांक १४ मधील अजिंठा नगर व लहुजी चौक येथील रस्ता अतिशय खराब झाल्याने
नागरिकांना जाणे येणे करतांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते,या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत येथील नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना वेळोवेळी कळविले होते,दि.०२/०९/२०२१ रोजी निवेदनही देण्यात आले होते व दि.०९/०९/२०२१ रोजी नगर परिषद कार्यालयातील पोर्च मध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे व स्थानिक रहिवाशी उपोषणाला बसणार असेही कळविले होते,दि.०३/०९/२०२१ रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती,शहरातील भुयारी मार्ग व रस्ते याबाबत नगराध्यक्षांनी सविस्तर माहिती दिली व तात्पुरते स्वरुपात नाली बांधकाम करुन रस्ता सपाटीकरण करून मुरुम टाकुन रोलर फिरविण्याचे सांगितले,परंतु सततधारेच्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय जास्तच झाली,गरज राहिल वास्तवतेची,या रस्त्याची दुरावस्था पाहुन कर्तव्यदक्ष नगर सेवक तथा डिपीडिसी सदस्य सिध्दार्थ बनसोडे यांनी तातडीने नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून स्वखर्चाने लहुजी चौक येथील रस्त्यावरील जेसिबीने चिखल,गाळ काढुन त्यावरती दगडाची खडी टाकुन रोलर फिरवुन नागरिकांची होणारी गैरसोय दुर केली,कर्तव्यदक्ष नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी त्यांच्या प्रभागात विकासकामे मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असुन महत्त्वाचे म्हणजे बौध्द श्मशान भुमीतील वर्षानुवर्षे रेंगाळलेली विकास कामे ही पुर्ण केली आहेत,आज दि.०७/०९/२०२१ रोजी भर पावसात चिंब भिजत त्यांनी नागरिकांची गैरसोय दुर केली असुन सोय केल्या बद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत,यात प्रामुख्याने नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंगुलभाऊ बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,बाळु कांबळे, सलीमभाई शेख,सुरज वाघमारे, नितिन क्षिरसागर,आतिश पेठे,बालाजी क्षिरसागर,जलील कुरेशी, मस्तान कुरेशी,नितीन पेठे,किरण गाडे,आदेश बनसोडे,बाबा पठाण,बाळु,चांदणे अन्य इतर नागरिक उपस्थित होते.