उस्मानाबाद - राजीव गांधी नगर येथील नगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी तसेच ही कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप करत दलित महासंघाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि १४ जून पासून आमरण उपोषणाला बसले होते.
हे आमरण उपोषण मागे घेण्याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी येलगट्टे यांनी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तूपसुंदरे यांची भेट घेऊन हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्यात येईल व नगरपरिषद प्रशासन योग्य ती हमी घेईल अशी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेतले आहे.
आंदोलन कशासाठी हे पाहण्यासाठी व्हिडिओ पहा
No comments:
Post a Comment